शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

एकाच पावसात बनगरवाडी तुडुंब ! वळवाने विहिरी भरल्या : वॉटर कप स्पर्धेतील कष्ट फळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 21:46 IST

गावाची एकी, तरुणांचा सहभाग असलेतर अशक्य गोष्टही शक्य होऊन जाते, ते दाखवून दिले आहे दुष्काळी बनगरवाडी गावाने. प्रथमच वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या या गावातील विहिरी वळवाच्या पहिल्याच पावसाने तुडुंब भरून

नितीन काळेलसातारा : गावाची एकी, तरुणांचा सहभाग असलेतर अशक्य गोष्टही शक्य होऊन जाते, ते दाखवून दिले आहे दुष्काळी बनगरवाडी गावाने. प्रथमच वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या या गावातील विहिरी वळवाच्या पहिल्याच पावसाने तुडुंब भरून गेल्या आहेत. शेततळे भरले आहे. विशेष म्हणजे पावसामुळे उन्हाळ्यातही ओढ्याला पाणी वाहत असून, जनावरांना पाणी उपलब्ध झाले आहे.

माण तालुक्यातील बनगरवाडी (वरकुटे मलवडी) गाव दुष्काळी. तसे पाहिलं तर गाव माळरानावर वसलेलं. येथील शेती पूर्णपणे पावसाच्या भरवशावर. ज्यावर्षी चांगला पाऊस पडेल तेव्हा खरीप व रब्बी हंगाम घेता यायचा; पण उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती व्हायची. लोकांना टँकरने पाणी मिळायचं; पण येथील मेंढपाळांना पाण्यासाठी दूरदूरवर जायला लागायचं. असं असताना गेल्या दोन-तीन वर्षांपासून येथील चित्र बदलू लागलं आहे. ग्रामस्थांची एकी आणि तरुणांचा सहभाग वाढल्यामुळे जलसंधारणाची कामं होऊ लागली आहेत. गेल्यावर्षी एका जुन्या पाझर तलावाची व बंधाऱ्याची दुरुस्ती झाली. त्यामुळे पाणीपातळी वाढल्याने लोकांना जलसंधारणाचं महत्त्व समजलं. त्यातूनच यावर्षी पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत गावाने सहभाग घेतला.

गावचे सुपुत्र व आयकर विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. नितीन वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली गाव स्पर्धेत उतरलं. त्यानंतर सरपंच रंजना बनगर, उपसरपंच सागर बनगर, पाण्यासाठी सुरुवातीपासून तळमळीने पुढे येऊन काम करणारे ग्रामपंचायत सदस्य विक्रम शिंगाडे यांनी वॉटर कप स्पर्धेचं काम हाती घेतलं. लोकांमध्ये जागृती केली. त्यामुळे सलग ४५ दिवस दररोज ३५० ते ४०० ग्रामस्थ श्रमदान करीत होते. उन्हातान्हाची पर्वा न करता त्यांचे हे काम सुरू होतं. त्यामुळेच स्पर्धेतील उद्दिष्टापेक्षा अधिक काम झालं आहे. याचा फायदाही आता दिसून आला आहे.

गेल्या आठ दिवसांपूर्वी वळवाचा पहिला पाऊस बनगरवाडी परिसरात झाला. ओढ्यानं वाहून जाणारं पाणी जागोजागी अडविल्याने विहिरी तुडुंब भरल्या आहेत. त्यामुळे वरूनही हातानं पाणी घेता येईल, अशी स्थिती आहे. शेततळ्यात हजारो लिटरचा पाणीसाठा झाला आहे. ओढ्याला पाणी वाहत असल्याने मेंढपाळांना पाणी उपलब्ध झालं आहे. पहिल्याच वॉटर कप स्पर्धेतील या यशाने गावाचा उत्साह वाढला आहे. त्यामुळे गावानं आता यापुढेही जलसंधारणाचं काम सुरूच ठेवण्याचा निश्चय केला आहे.दुष्काळी माण तालुक्यातील बनगरवाडीत यंदा झालेल्या जलसंधारणाच्या कामामुळे पहिल्याच पावसात विहिरी तुडुंब भरल्या.

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धाwater shortageपाणीटंचाई